वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा
२०२१ मध्ये भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालय, भूमी संसाधन विभागाच्या वतीने या नवीन पिढीतील पाणलोट विकास २.० प्रकल्पाला प्रारंभ झाला. महाराष्ट्रात ३० जिल्ह्यांमधील १५२० गावांतील १४० पाणलोट प्रकल्पांमध्ये पाणलोटाचे उपचार करून सुमारे ५.२५ लाख हेक्टरवर काम करण्यात येणार आहे.
ही कामे हवामान बदलांच्या प्रभाव लक्षात ठेऊन केले जात असून, त्यासाठी अंदाजे १२५१ कोटी रुपये आर्थिक निधी वापरला जाणार आहे. राज्यात हा कार्यक्रम वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा या राज्यस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून कार्यान्वित केला जात आहे